YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 20:1-15

नीतिसूत्रे 20:1-15 MRCV

मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते; तिच्यामुळे जे पथभ्रष्ट होतात ते शहाणे नाहीत. राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा भयप्रद आहे; जो त्याचा राग जागृत करतो त्याची प्राणहानी होते. कलहापासून दूर राहणे मनुष्याचा सन्मान आहे, परंतु प्रत्येक मूर्ख भांडणास तत्पर असतो. आळशी निर्धारित ऋतूमध्ये नांगरणी करीत नाहीत; म्हणून हंगामाच्या वेळी शोधून त्यांना काहीही मिळणार नाही. मनुष्याच्या अंतःकरणाचे उद्देश हे खोल पाण्यासारखे आहेत, परंतु ज्याच्याकडे अंतर्दृष्टी असते तो त्या उद्देशांना ओढून बाहेर काढतो. पुष्कळजण अतूट प्रेम असल्याचा दावा करतात, परंतु प्रामाणिक मनुष्य कोणाला सापडेल? नीतिमान मनुष्य निष्कलंकीतपणे चालतो; त्याच्यामागे त्याच्या मुलाबाळांना आशीर्वाद प्राप्त होतात. जेव्हा राजा न्याय करण्यासाठी सिंहासनावर बसतो तेव्हा तो त्याच्या नजरेने सर्व वाईट पाखडून दूर करतो. “मी माझे अंतःकरण शुद्ध ठेवले आहे, मी शुद्ध आहे आणि पाप केलेले नाही.” असे कोण म्हणू शकेल? वजनावजनांत व मापामापांत फरक असणे— या दोन गोष्टींचा याहवेहला वीट आहे. अगदी लहान मुलेसुद्धा खरोखरच प्रामाणिक आणि निर्दोष आहेत ते त्यांच्या कृत्यांवरून ओळखली जात नाहीत काय? पाहणारे डोळे व ऐकणारे कान— दोन्हीही याहवेहचीच निर्मिती आहे. तू झोपेची आवड धरू नकोस, नाहीतर तू गरीब होत जाशील; जागा राहा आणि तुझ्याकडे विपुल खाद्य शिल्लक राहील. खरेदी करणारा म्हणतो, “हे चांगले नाही, हे चांगले नाही!” नंतर तो जातो आणि खरेदी बद्दल बढाई मारतो. सोने आहे आणि माणकेही भरपूर आहेत, परंतु शहाणपणाचे शब्द बोलणारे ओठ दुर्मिळ रत्न आहे.

नीतिसूत्रे 20 वाचा