YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 16:1-16

नीतिसूत्रे 16:1-16 MRCV

अंतःकरणाच्या योजना मानव करतो, परंतु जिभेचे योग्य उत्तर याहवेहपासून येते. मनुष्यास वाटते कि त्याचे सर्व मार्ग शुद्ध आहेत, परंतु याहवेह त्याचा उद्देश पारखतात. तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या, आणि ते तुमच्या योजना यशस्वी करतील. याहवेह सर्व कार्ये योग्य रीतीने सिद्धीस नेतात. दुष्टांच्या विनाशासाठी देखील त्यांनी एक दिवस नेमला आहे. याहवेह गर्विष्ठ अंतःकरण असलेल्यांचा सर्वांचा तिरस्कार करतात. याची खात्री असू द्या: त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. दया व सत्य यामुळे पापांचे प्रायश्चित होते; आणि याहवेहचे भय धरल्यामुळे दुष्टता टाळली जाते. जर एखाद्या मनुष्यांचे मार्ग याहवेहला आवडले, तर ते त्याच्या शत्रूंबरोबरसुद्धा त्यांचा समेट घडवून आणतात. अप्रामाणिक मार्गाने मिळविलेल्या अफाट संपत्तीपेक्षा प्रामाणिकपणे मिळविलेले थोडकेच बरे. मानव त्यांच्या हृदयात त्यांच्या योजना करतात परंतु याहवेह त्यांच्या मार्गांची दिशा ठरवितात. राजाच्या ओठांतील शब्द एखाद्या दिव्य वाणीप्रमाणे आहेत, आणि त्याचे मुख न्याय-विसंगति करीत नाही. प्रामाणिकपणाची मापे आणि तराजू याहवेहची आहेत पिशवीतील सर्व वजने त्यांनीच तयार केली आहेत. राजांना वाईट कृत्त्यांचा तिरस्कार वाटतो; कारण न्यायीपणावरच सिंहासन स्थिर राहते. प्रामाणिकपणे बोलणारे राजांना प्रसन्न करतात; जे योग्य ते बोलतात त्याच्यावर ते प्रीती करतात. राजाचा क्रोध म्हणजे मृत्यूचा दूत, परंतु सुज्ञ मनुष्य तो क्रोध शमवेल. जेव्हा राजाचा चेहरा चमकतो, याचा अर्थ जीवदान आहे; त्याची कृपा वसंतऋतूमध्ये आलेल्या पावसाच्या ढगासारखी आहे. सोन्यापेक्षा सुज्ञता मिळविणे कितीतरी पटीने चांगले आहे, आणि समंजसपणा, चांदी मिळविण्यापेक्षा चांगले आहे!

नीतिसूत्रे 16 वाचा